निलंग्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर जिल्ह्याच्या निलंग्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.

Updated: May 28, 2018, 07:53 PM IST

लातूर : लातूर जिल्ह्याच्या निलंग्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी वारा आणि पावसामुळे निलंग्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी मोबाईल टॉवरही कोसळले आहेत.