सर्व नेत्यांना ईश्वर सुबुद्धी देवो - अमृता फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यात लवकर नवं सरकार स्थापन होईल

Updated: Nov 1, 2019, 11:24 PM IST
सर्व नेत्यांना ईश्वर सुबुद्धी देवो - अमृता फडणवीस title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यात लवकर नवं सरकार स्थापन होईल, अशी इच्छा व्यक्त केली आहे. सर्व नेत्यांना ईश्वर सुबुद्धी देवो आणि राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होवो, असं देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. गोरेगावातील कोकण प्रान्त हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी अमृता फडणवीस बोलत होत्या. 

भाजपला विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वात जास्त १०५ जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ जागांची गरज आहे. यासाठी शिवसेना या मित्र पक्षाची भाजपला गरज आहे. कारण शिवसेनेने ५६ जागा मिळवल्या आहेत. शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार स्थापन होणार आहे.

मात्र शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्याने, भाजपाला देखील कोणताही निर्णय घेता येत नाहीय. सरकार कधी स्थापन होईल यांची उत्कंठा सर्वांना लागून आहे.