एस टी मधील २७००० कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती लागू करा

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

Updated: Jun 26, 2020, 03:27 PM IST
एस टी मधील २७००० कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती लागू करा title=

मुंबई : एसटी महामंडळाच्या एकूण अर्थसंकल्पात सर्वात जास्त खर्च डिझेल व वेतनावर होत असून एकूण १ लाख २००० कर्मचाऱ्यांपैकी जेष्ठ २७ हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करावी तसेच कंत्राटी पद्धतीवरील १६०० कर्मचाऱ्यांच्या जागी एसटी मधिल कायम कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी त्या मुळे खर्चात मोठी बचत होऊन उध्वरीत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल. 

भविष्यात वेतन वाढ सुद्धा करता येईल अशा मागणीचे पत्र  महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनेने, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ना. अनिल परब यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून दिले आहे. लॉक डाऊनमुळे एसटी महामंडळाचे दररोज २२कोटी इतके उत्पन्न बुडत आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर तसेच पूर्ण वेतन मिळत नाही.गेले तीन महिने वेतन उशिरा व कमी मिळत असल्याने व अगोदरच वेतन तुटपुंजे असल्याने कर्मचाऱ्यांनाआपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होऊन बसले आहे.

भाड्याच्या घरात राहणाऱ्या तसेच शाळा कॉलेजमध्यें शिक्षणासाठी मूले असलेल्या कर्मचाऱ्यांना तर भयंकर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहें.त्यामुळे डीजल तसेच वेतनावर  होणाऱ्या खर्चावर तत्काळ मर्यादा आणावी लागणार आहे. डिझेलवरील केंद्र व राज्य सरकारचा कर माफ केला पाहिजे या साठी महामंडळा कडून प्रयत्न व्हायला हवेत.याशिवाय २७ हजार जेष्ठ कर्मचाऱ्यांना फायदेशीर स्वेच्छानिवृत्ती योजना आणली व ते स्वेच्छेने निव्रूत झाले तर वेतन खर्चात मोठी बचत होऊ शकेल.तसेच कंत्राटी पद्धतीवरील अंदाजे १६०० कर्मचाऱ्यांच्या जागेवर एसटी मधील अतिरिक्त कर्मचारी वर्ग वापरला पाहिजे.त्या मुळे सुद्धा मोठी बचत होणार आहें. अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

एसटीमध्ये साधारण एक लाख दोन हजार कर्मचारी सध्या कार्यरत असून त्यांच्या वेतनासाठी भविष्य निर्वाह निधीतला हिस्सा तसेच इतर रक्कम धरून एकूण 270 ते 280 कोटी महिन्याचा खर्च होतो.त्यापैकी 27 हजार जेष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एकूण रुपये शंभर कोटी खर्च होतात तसेच राहिलेल्या साधारण ७५ हजार कर्मचाऱ्यांवर साधारण १७० ते १८० कोटी खर्च होतो याचाच अर्थ ज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनावर मर्यादा आणाव्या लागतील.त्यांच्यासाठी  चांगली फायदेशीर स्वेच्छानिवृत्ती योजना आणावी व असे कर्मचारी स्वेच्छेने निवृत्त झाले तर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल व भविष्यात चांगली वेतनवाढ सुद्धा करता येईल.

या शिवाय यापुढे अजून काही महिने वाहतूक सुरळीत होणार नाही अशी शक्यता आहे. त्या मुळे काहीं प्रमाणात अतिरिक्त कर्मचारी वर्ग होणार असून त्यांचा वापर एस टी मध्यें अंदाजे सोळाशे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत असून त्यांच्यावर साधारण चार कोटींचा खर्च होत आहे तो खर्च वाचविण्यासाठी एसटी मधिल अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काम द्यावे. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांना काम मिळेल व त्या मुळे एसटीचे महिन्याला अंदाजे चार कोटी वाचतील असेही या निवेदनात नमूद करण्यातआले आहें.यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे कोषाध्यक्ष संतोष गायकवाड हे हजर होते