मुख्यमंत्री आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचे २१ सातबारे, सोमय्यांचा आरोप

 जमिनी विकत घेणं हा ठाकरे आणि नाईक कुटुंबांचा व्यवसाय आहे का ? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केलाय.

Updated: Nov 12, 2020, 06:28 PM IST
मुख्यमंत्री आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचे २१ सातबारे, सोमय्यांचा आरोप  title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचे मिळून २१ सातबारे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलाय. ठाकरे आणि नाईक कुटुंबीयांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी का केली असा सवालही किरीट सोमय्यांनी केलाय. जमिनी विकत घेणं हा ठाकरे आणि नाईक कुटुंबांचा व्यवसाय आहे का ? असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केलाय. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजपच्या वर्मावर घाव बसलाय. आणि त्याच निराशेतून असे आरोप होत असल्याचा पलटवार शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी केलाय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत शपथपत्रात सर्व माहिती दिली आहे. एक महिन्यात म्हणजे १२ डिसेंबरपर्यंत पुरावे न दिल्यास त्यांनी माफी मागावी असे आव्हान शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी दिलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तरं दिली.  किरिट सोमैया यांनी सातत्यानं जे विषय काढले आहेत, ते जेवणातील लोणच्यासारखे आहेत. त्यांनी आतापर्यंत जेवढे आरोप केलेत, त्याचे एक पुस्तक होईल. त्यांनी न्यायालयात जरूर जावावे असे निलम गोऱ्हे म्हणाल्या. 

किरिटी सोमैया पाणचट आहेत, असं रविंद्र वायकर बोललेत, ते खरंय असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच नारायण राणेंना वैफल्याची लागण झालीय असेही त्या म्हणाल्या.