सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रिमंडळात वाझे नसता- फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवर अशी दिली प्रतिक्रिया...

Updated: May 15, 2022, 08:46 PM IST
सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रिमंडळात वाझे नसता- फडणवीस title=

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्यूत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर उत्तर दिलंय.

पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

'पंतप्रधानांची मिटींग आयपीएल सारखी पाहत होते म्हणाले. हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे. तुम्ही तर महाराष्ट्र ही आयपीएल सारखेच चालवत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकरी, मराठा समाज यांच्याकडे कोण पाहणार आहे.?'

'मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं, लिंक रोड, नवी मुंबई एअरपोर्ट, सी लिंक असे अनेक कामे केली. पण तुम्ही काय विकास केला. दारुचा टॅक्स कमी केला.'

'राजा घराबाहेर पडेल तेव्हा कळेल गरीब कसा राहतो आहे. राजमहलात राहून नाही कळणार.'

'सकाळचा शपथविधी केला. तो यशस्वी झाला नाही याचा आनंद आहे. झाला असता तरी माझ्या मंत्रिमंडळात वाझे नसता, अनिल देशमुख, नवाब मलिक नसता.'

'सामनामध्ये सत्य छापून येतं म्हणाले. 2014 पूर्वी सोनिया गांधी आणि शरद पवारांबाबत जे छापून येत होतं. ते खरं आहे ते सांगणार आहेत का? शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं?'