उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाना दिली 'ही' महत्वाची सूचना

अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.

Updated: Apr 15, 2018, 06:29 PM IST
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाना दिली 'ही' महत्वाची सूचना title=

मुंबई : अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

शिवसैनिकांचं अटकसत्र सुरू झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. 

मातोश्रीवर नगरच्या शिवसैनांसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी दिलीय. यासाठी येत्या मंगळवारी नगरहून हजारो शिवसैनिक मंगळवारी मुंबईत दाखल होणार असल्याची माहितीही राठोड यांनी दिलीय. 

तर २५ एप्रिलला उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौ-यावर जाणार आहेत. तसंच सोमवारी रामदास कदम, एकनाथ शिंदे, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर केडगावला जाणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाना दिली 'ही' महत्वाची सूचना