मुंबईत ऐन पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

इतक्या घाईगडबडीत रस्ते तयार करण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Updated: Jun 7, 2018, 04:52 PM IST

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईत रस्ते खोदले जात असल़्याचं वृत्त झी २४ तासनं समोर आणलं होतं. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ५ दिवस अगोदर म्हणजे २४ मे रोजी मुंबई विद्यापीठ आणि ओव्हल मैदानांमधील रस्ता खोदला गेल्याचं वृत्त 'झी २४ तास' वर दाखवण्यात आलं होतं. तो रस्ता देखील अपुर्णावस्थेत असल्यानं इथंही वाहतूक कोंडी पाहायला मिळते. तसंच इतक्या घाईगडबडीत रस्ते तयार करण्याची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.