मोठी बातमी : मुंबईतही CAB आंदोलनाचा भडका

दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईला विरोध 

Updated: Dec 16, 2019, 12:11 PM IST
मोठी बातमी : मुंबईतही CAB आंदोलनाचा भडका  title=

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही निदर्शन करण्यात आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. 

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (Citizenship Amendment Act)पूर्वोत्तर राज्य, पश्चिम बंगाल आणि राजधानी दिल्लीनंतर आता मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. टीसच्या विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी  दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध म्हणून आंदोलन केले आहे. या आंदोलनात त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. 

सुरूवातीला या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबची झाली. मात्र नंतर अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पुढे सरकत असून ते आता चेंबुरच्या दिशेने चालला आहे. (नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत निदर्शनं; आंदोलनाला हिंसक वळण) 

दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह १०० हून अधिक जण जखमी झाले. अग्निशमन दलातील जवानांवर हल्ला करण्यात आल्यानंतर पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात अश्रूधुराच्या निळकांड्या फोडल्या. त्यानंतर विद्यापीठात घुसलेल्या आंदोलकांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांविरोधात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. 

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आलेल्या ५० विद्यार्थ्यांना सोमवारी पहाटे सोडण्यात आले. त्यातील ३५ जणांना कालकाजी पोलीस ठाणे, उर्वरित एकाला न्यू फ्रेंड्स कॉलनीमधून सोडण्यात आले. दिल्लीतील हिंसाचारानंतर दिल्ली मेट्रोने ११ स्टेशनांवर मेट्रो सेवा बंद केली आहे. तर दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.