राज ठाकरे सावध, नगरसेवकांशी साधणार संवाद

मुंबईतील सहा नगरसेवकांनी बंडखोरी करत मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता राज ठाकरे अधिक सावध झाले आहेत. राज ठाकरे त्यांच्या इतर शहरातील नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी दौरा करणार आहे.

Updated: Oct 16, 2017, 02:02 PM IST
राज ठाकरे सावध, नगरसेवकांशी साधणार संवाद title=

मुंबई : मुंबईतील सहा नगरसेवकांनी बंडखोरी करत मनसेला रामराम ठोकल्यानंतर आता राज ठाकरे अधिक सावध झाले आहेत. राज ठाकरे त्यांच्या इतर शहरातील नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी दौरा करणार आहे.

राज ठाकरे दिवाळी नंतर कल्याण-डोंबिवली दौरा करणार आहेत, अशी माहिती झी २४ तासच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईत नगरसेवक फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. दिवाळी नंतर ३ दिवस राज ठाकरे कल्याण डोंबिवलीत मुक्कामाला जातील अशी माहिती आहे. मनसे नगरसेवकांशी राज ठाकरे संवाद आहेत.

KDMC मध्ये मनसे चे ९ नगरसेवक आहेत तर एका अपक्ष नगरसेवकानं मनसेला पाठिंबा दिलाय. पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे अनुक्रमे ३, ५ आणि १० नगरसेवक आहेत. त्या सर्वांना विश्वासात घेऊन, त्यांच्या तक्रारी-सूचना जाणून घ्यायचं राज यांनी ठरवलंय.