... तर दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार - रामदास आठवले

एमआयएम-भारिप युतीवर आठवलेंची प्रतिक्रिया

Updated: Oct 3, 2018, 03:30 PM IST
... तर दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार - रामदास आठवले title=

मुंबई : रिपब्लिकन पक्षाला लोकसभा निवडणुकीत 2 ते 3 आणि विधानसभा निवडणुकीत 30 ते 35 जागा हव्या आहेत. यंदा पक्ष 50 टक्के जागा नॉन दलितांना देणार आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

'शिवसेना स्वतंत्र लढल्यास दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत. मी, राहुल शेवाळे आणि एकनाथ गायकवाड अशी लढत होईल. मी विजयी होईन. पण भाजप सेना एकत्र लढल्यास माझ्यासाठी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेनेला करणार. मुख्यमंत्री शिवसेनेची समजूत काढतील.'

एमआयएम-भारिप युतीचा फायदा भाजप आरपीआयला होईल. मुख्यमंत्री पदापर्यंत पोचण्याइतपत ही आघाडी मोठी नाही. या आघाडीचे 2 - 3 आमदार तरी निवडून येतील का अशी मला शंका आहे. पण या आघाडीला काही मतं मिळतील. ज्याचा आम्हाला फायदा होईल. दलित मतं प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आहेत असं मानण्याचा काही भाग नाही. माझ्यामागे समाजाची मोठी ताकद आहे.'

भारिप- एमआयएम युतीमागे भाजप नाही, पण या युतीमुळे भाजप नक्की पुढे जाणार आहे. असं देखील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.