राज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. 

Updated: Jul 18, 2017, 07:45 PM IST
राज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द  title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. २०१२मध्ये राज ठाकरेंनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढलेल्या मोर्चाप्रकरणी दाखल करण्यात आलेला खटला मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे.

ऑगस्ट २०१२मध्ये रझा अकादमीनं आझाद मैदानात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं. या मोर्चामध्ये दोन जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी झाले होते. या जमावानं पोलिसांना मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरेंनी मोर्चा काढला होता. राज ठाकरेंनी परवानगी नसतानाही मोर्चा काढल्यामुळे त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x