विधान परिषदेसाठी शिफारस केलेल्या २० जणांपैकी ८ नावांना आक्षेप

विधान परिषदेसाठी शिफारस केलेल्या २० जणांपैकी ८ नावांना आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

Updated: Dec 23, 2020, 05:25 PM IST
 विधान परिषदेसाठी शिफारस केलेल्या २० जणांपैकी ८ नावांना आक्षेप title=

मुंबई : विधान परिषदेसाठी शिफारस केलेल्या २० जणांपैकी ८ नावांना आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांद्वारे राज्यपालांच्या याबाबतच्या अधिकारांच्या वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसैन, चंद्रकांत रघुवंशी आणि विजय करंजकर या आठ जणांच्या नावाला आक्षेप घेण्यात आलाय. 

राज्यात डॉ. जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, डॉ. विजय भाटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारखी विज्ञान क्षेत्रात, तर अण्णा हजारे, मेधा पाटकर, डॉ. प्रकाश आमटे यांच्यासारखी सामाजिक क्षेत्रातील मंडळींची नियुक्ती करण्याऐवजी खडसेंसारख्या नेत्याचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली जात आहे असा आरोप करण्यात आला.