टीम इंडियासमोर २२० धावांचं आव्हान

जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकने टीम इंडियासमोर 220 रन्सचं आव्हान ठेवल आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

Updated: Mar 31, 2012, 07:52 AM IST

www.24taas.com, जोहन्सबर्ग

 

जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या एकमेव टी-20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकने टीम इंडियासमोर 220 रन्सचं आव्हान ठेवल आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरूवात थोडी अडखळती झाली. ओपनिंग बॅट्समन रिचर्ड लेवी 19 रन्सवर आऊट झाली.

 

मात्र यानंतर जॅक कॅलिस आणि इनग्रामने अनुक्रमे 61 आणि 78 रन्सची तडाखेबंद खेळी केली. टीम इंडियाकडून सुरेश रैनाने दोन विकेट्स घेतल्या. तर इरफान पठाण आणि आर. अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

कोणत्याही टीमचं नशीब बदलण्यासाठी एक चांगल्या विजयाची गरज असते.आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी भारताची लढत टीम इंडियाकरत म्हणूनच महत्वाची आहे. त्यामुळे पराभवांमुळे अडचणीत सापडलेल्या टीम इंडियासाठी ही मॅच संजीवनी देणारी ठरेल.

Tags: