‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 7, 2014, 08:47 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने ‘गुलाब गँग’ या सिनेमाच्या प्रदर्शनावर ८ मेपर्यंत देशभरात बंदी घातली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे ‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून ठरलेल्याच दिवशी म्हणजे ७ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

बुंदेलखंड (बांदा)च्या ‘गुलाब गँग’ च्या कमांडर संपत पाल यांच्या जीवनपटावर हा सिनेमा बेतला असल्याचे त्यांनी दावा केला होता. हा सिनेमा तयार करण्यापूर्वी निर्माता आणि दिग्दर्शकांनी आपल्याशी चर्चा केली नसल्याचे संपत लाल यांचे म्हणणे होते. संपत पाल यांनी बुधवारी सिनेमाचे प्रदर्शन रोकण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सिनेमाची नायिका आपली भूमिका निभावतेय आणि सिनेमाच्या प्रोमोत आपल्याला चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. त्यामुळे आपल्या इमेजला धोका पोहोचतो, असे संपत पाल यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते. याच्या भरपाईसाठी त्यांनी निर्मात्यांकडे आर्थिक नुकसान भरपाईचीदेखील मागणी केली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटावर बंदी आणली होती.
या बंदीविरोधात सर्वोच्य न्यायालयात धाव घेण्यात आली होती. न्यायालयाने बंदी उठविताना याचिका दाखल करण्यासाठी एवढा वेळ का लावला? असा सवाल संपत पाल यांना केला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.