भारत X इंग्लड : इंग्लंडकडून भारताचा ९ रन्सनं पराभव

सौराष्ट्र किक्रेट स्टेडियमवर शुक्रवारी रंगलेल्या वनडे मॅच सीरिजमधल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केलाय. भारताला ९ रन्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 11, 2013, 08:48 PM IST

www.24taas.com, राजकोट
सौराष्ट्र किक्रेट स्टेडियमवर शुक्रवारी रंगलेल्या वनडे मॅच सीरिजमधल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा पराभव केलाय. भारताला ९ रन्सनं पराभव स्वीकारावा लागलाय.
इंग्लंडनं भारतासमोर ३२६ रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण, टीम इंडियाला ५० ओव्हर्समध्ये केवळ ३१६ रन्स करता आले. त्यामुळे वन डे सीरिजमधल्या पाच मॅचपैकी पहिलीच मॅच भारतानं ९ रन्सनं हरली. भारतातर्फे युवराज सर्वात जास्त म्हणजेच ६१ रन्सची खेळी केली.