तामिळनाडूत जोरदार पाऊस, ५५ जण मृत्यूमुखी

तामिळनाडू राज्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. यामुळे झालेल्या दुर्घटनांत मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता 55 झालाय. 

Updated: Nov 13, 2015, 06:24 PM IST
तामिळनाडूत जोरदार पाऊस, ५५ जण मृत्यूमुखी  title=

चेन्नई : तामिळनाडू राज्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. यामुळे झालेल्या दुर्घटनांत मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता 55 झालाय. 

ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्यानं, तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे चेन्नईसह इतर शहरं आणि जिल्ह्यांतही जागोजागी रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. 

आणखी काही दिवस, तामिळनाडूनमध्ये असाच तडाख्याचा पाऊस पडणार असल्याचा इशारा, वेधशाळेनं दिलाय. 

दरम्यान पावसामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना, तामिळनाडू सरकारनं चार लाखांची मदत जाहीर केली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.