अबब!!!! बघा ही भारताची लोकसंख्या झाली तरी केवढी

२००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली आहे. १ मार्च २०११ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २० कोटी झाली आहे.

Updated: May 1, 2013, 12:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
२००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली आहे. १ मार्च २०११ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २० कोटी झाली आहे.
गेल्या दशकात देशाची लोकसंख्या १७.७ टक्क्यांनी वाढली आहे. या लोकसंख्येत महिलांची संख्या तुलनेत जास्त असल्याचे आढळून आले आहे. भारताची लोकसंख्या १ अब्ज २१ कोटी असून त्यात पुरूषांची संख्या ९ कोटी ९ लाख ७० हजार आहे तर महिलांची संख्या ९ कोटी ९ लाख ९० हजार आहे. सार्वधिक लोकसंख्या असलेले राज्य बिहार आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षरतेत वाढ झाली आहे. ही वाढ ८ टक्के असून ६४.८ टक्क्यांवरून ७३ टक्के एवढी साक्षरतेत वाढ झाली आहे.