अम्मांच्या निधनानंतर 280 लोकांचा मृत्यू

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुककडून देण्यात आलीये.

Updated: Dec 10, 2016, 01:05 PM IST
अम्मांच्या निधनानंतर 280 लोकांचा मृत्यू title=

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुककडून देण्यात आलीये.

5 डिसेंबरला जयललिता यांचे निधन झाले. अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तामिळनाडूत जयललिता यांची ओळख अम्मा अशी होती. त्यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुकने दिलीये.

तसेच या मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा अण्णाद्रमुककडून करण्यात आलीये.