एक इंजिनिअर बनलाय ‘जगतगुरू बाबा रामपाल’

हिरयाणातील वादग्रस्त रामपाल बाबा यांचे समर्थक आणि पोलिस यांच्या सुरु असलेल्या धुमचक्रीत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झालेत. हिस्सारमध्ये अशी परिस्थिती नक्की का निर्माण झाली आणि हे रामपाल बाबा नक्की आहेत तरी कोण हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील... त्याचीच ही उत्तरं... 

Updated: Nov 19, 2014, 06:48 PM IST
एक इंजिनिअर बनलाय ‘जगतगुरू बाबा रामपाल’ title=

हिस्सार : हिरयाणातील वादग्रस्त रामपाल बाबा यांचे समर्थक आणि पोलिस यांच्या सुरु असलेल्या धुमचक्रीत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झालेत. हिस्सारमध्ये अशी परिस्थिती नक्की का निर्माण झाली आणि हे रामपाल बाबा नक्की आहेत तरी कोण हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील... त्याचीच ही उत्तरं... 

खून प्रकरणातला आरोपी ‘बाबा रामपाल’
एका खून प्रकरणात हरयाणातले संत रामपाल यांच्याविरुद्ध पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं आजामीनपात्र वॉरंट जारी केलाय. त्या आदेशानुसार, रामपाल यांना कोर्टापुढं हजर करण्यासाठी पोलीस पथक हिस्सार इथल्या रामपालांच्या बरवाला आश्रमात गेलं असता, रामपाल सर्मथकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. यामुळे निर्माण झालेल्या चकमकीमध्ये काही जणांना आपला जीव गमवावा लागलाय. आत्तापर्यंत आश्रामातून हजारोंच्या संख्येने नागरिकांना बाहेर काढण्यात आल असून चाळीसहून अधिक मिलिट्री फोर्स आणि पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 

हिस्सारमध्ये रामपालच्या समर्थकांचा हिंसाचार...
१२ जुलै २००६ मध्ये रोहतकमधील आश्रमाबाहेर दोन गटांमध्ये हिसांचार झाला त्यामध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. गोळीबार रामपाल यांच्या आश्रमातून झाल्याचा आरोप मृत व्यक्तिच्या भावाने केला. याप्रकरणी बाबा रामपालसह ३७ समर्थकांविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर स्थानिकांनी रामपाल यांच्या करौथातील आश्रमाला विरोध केला. १२ मे २०१३ रोजी आश्रमात तिघांचा मृत्यू झाला यानंतर १४ मे २०१३ रोजी आश्रम खाली करण्यात आला. याप्रकरणी रामपाल हे अनेकदा सुनावणीला हजरच न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता आजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी हिंसाचार सुरु केलाय.

इंजिनिअर ते जगतगुरु...
रामपाल यांचा १९५१ मध्ये धनानामध्ये जन्म झाला. इंजिनिअरचं शिक्षण घेतलेल्या रामपाल यांनी २००० मध्ये सिंचन विभागातील नोकरी सोडून कबीरपंथ अवलंबला. आपल्या वेबसाईटवर स्वत:ला जगतगुरु अशी उपाधी देणा-या रामपाल यांनी २००६ मध्ये महर्षी दयानंद यांच्याबाबात साईटवर वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या कथित टिप्पणीनंतर रामपाल समर्थक आणि आर्य समाजात वाद निर्माण झाला त्यातूनच एकाचा खून झाल्याने हे प्रकरण पुढे चिघळत गेल. दरम्यान रामपाल यांनी हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि सनातन धर्माशी संबंधित गोष्टींवर सवाल उपस्थित केल्याने चांगलात वाद निर्माण झाला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.