मणिपूर : दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद

मणिपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० जवान शहीद झालेत. या हल्यामध्ये ८ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमी जवानांना नागालँडमध्ये हवाईमार्गे उपाचारांसाठी हलवण्यात आले आहे.

PTI | Updated: Jun 4, 2015, 03:52 PM IST
मणिपूर : दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद  title=

इम्फाळ : मणिपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० जवान शहीद झालेत. या हल्यामध्ये ८ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमी जवानांना नागालँडमध्ये हवाईमार्गे उपाचारांसाठी हलवण्यात आले आहे.

सकाळी ६, डोग्रा रेजिमेंटचे जवान एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची तयारी करत होते. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला चढवला. दहशतवाद्यांकडे रॉकेट लाँचर्स, बॉम्ब आदी आधुनिक शस्त्रास्त्रे होती, असे लष्करी अधिका-यांनी सांगितले.

हा हल्ला स्थानिक दहशतवाद्यांनी केल्याचा संशय आहे. या भागामध्ये जवळपास ८ ते १० दहशतवादी संघटना असल्यामुळे हा हल्ला नक्की कोणत्या गटाने केलाय, याबाबत खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे सांगण्यात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.