स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू

स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा कोकणात रस्ते अपघातात मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड इथं हा अपघात झालाय.

Updated: Jul 20, 2014, 07:09 PM IST
स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू title=

रत्नागिरी: स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा कोकणात रस्ते अपघातात मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड इथं हा अपघात झालाय.

प्रदेश संघटक सुभाष पाटील आणि अश्विन पाटील अशी मृतांची नावं आहेत. फॉर्च्युनर आणि कंटनेरचा टक्कर होत हा भीषण अपघात झाला. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हे दोघं कणकवलीहून मुंबईच्या दिशेनं निघाले होते.

कणकवलीत नितेश राणे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. ती बैठक आटोपून हे दोघंही मुंबईच्या दिशेने निघाले होते. हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातले रहिवासी आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.