स्वातंत्र्यानंतर या गावात झालं पहिल्यांदाच मतदान!

लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातल्या धनगरवाडी या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान झालंय. 

Updated: Feb 16, 2017, 06:23 PM IST
स्वातंत्र्यानंतर या गावात झालं पहिल्यांदाच मतदान! title=

लातूर : लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातल्या धनगरवाडी या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान झालंय. 

८०० लोकसंख्या असलेल्या या गावाला स्वातंत्र्यापासून मतदान केंद्रच मिळालं नव्हतं. त्यामुळे धनगरवाडीतले ३१० मतदार हे ४ किलोमीटर लांब असलेल्या सानोळा गावात जाऊन मतदान करत होते. 

मात्र, यावेळेस पहिल्यांदाच धनगरवाडी गावातल्या मतदारांनी त्यांच्याच गावात जिल्हा परिषद शाळेतल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.