रामदास आठवलेंची मोदींवर कविता

आरपीआय रामदास आठवले त्यांच्या कवितांच्या माध्यमातून नेहमीच चर्चेमध्ये असतात. यावेळी त्यांनी थेट केंद्रातल्या मोदी सरकारवर कविता करून त्यांची खंत व्यक्त केली आहे. 

Updated: Jun 20, 2016, 09:23 PM IST
रामदास आठवलेंची मोदींवर कविता title=

जळगाव : आरपीआय रामदास आठवले त्यांच्या कवितांच्या माध्यमातून नेहमीच चर्चेमध्ये असतात. यावेळी त्यांनी थेट केंद्रातल्या मोदी सरकारवर कविता करून त्यांची खंत व्यक्त केली आहे. 

निवडणूक आली की आठवले आठवतात, निवडणूक झाली की दूर पाठवतात, असं म्हणत रामदास आठवलेंनी केंद्रात मंत्रीपद मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. मी सोबत असल्यानं शिवसेना-भाजपची सत्ता आली. हे दोघं असेच भांडत राहिले तर 2019 ला सत्ता येणार नाही, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.