५ वर्षात महाराष्ट्राला नंबर १ बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातलं नंबर एकचं राज्य बनवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज राज्य सरकारला दोन वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री नागपूरमध्ये बोलत होते.

Updated: Oct 31, 2016, 04:03 PM IST
५ वर्षात महाराष्ट्राला नंबर १ बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस title=

नागपूर : पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातलं नंबर एकचं राज्य बनवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज राज्य सरकारला दोन वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री नागपूरमध्ये बोलत होते.

2 वर्षात सरकारनं सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली... जलयुक्त शिवार आणि सिंचन क्षेत्रातील कामांच्या मदतीने 5 हजार गावे दुष्काळ मुक्त केलीयत, 5 वर्ष संपेपर्यंत  तब्बल 20 हजार गावे दुष्काळ मुक्त करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. दोन वर्षं पूर्ण होत असताना आम्ही celebration वर नव्हे तर communication वर भर दिलाय, असंही ते म्हणाले.