मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची दरवाढ टळली

 मुंबईतल्या मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी...मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयानं दीड महिन्याची स्थगिती दिलीय. 

Updated: Dec 17, 2015, 07:43 PM IST
मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची दरवाढ टळली  title=

मुंबई  :  मुंबईतल्या मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी...मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयानं दीड महिन्याची स्थगिती दिलीय. 

मेट्रोच्या भाडेवाढीनंतर याविषयी जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. यावर सुनावणी दरम्यान दरवाढीला 29 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आलीय. 

मट्रोची प्रस्तावित भाडेवाढ मोठ्या प्रमाणावर असून घाटकोपर ते वर्सोवाचे तिकीट दर 110 रुपयांवर जाणार आहेत. या भाडेवाढीविरोधात जनहीत याचिका करण्यात आलीय.