नाथाभाऊ फळबागांना अद्याप मदत का नाही?

भाजप-शिवसेना सरकारकडून दुष्काळात फळबागांना मदत देण्याविषयी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून अनेक घोषणा झाल्या.

Updated: May 30, 2016, 08:10 AM IST
नाथाभाऊ फळबागांना अद्याप मदत का नाही? title=

मुंबई : भाजप-शिवसेना सरकारकडून दुष्काळात फळबागांना मदत देण्याविषयी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून अनेक घोषणा झाल्या. मात्र यावर अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. फळबागांना जाहीर झालेली हेक्टरी मदत देखील अजून पोहोचलेली नाही. 

तलाठ्यांना याविषयी अजून कोणतीही सूचना सरकारकडून मिळालेली नसल्याचंही सांगण्यात येत आहे. फळबागांना सरसकट दुष्काळी मदत तसेच ज्या फळबागा टँकरच्या पाण्यावर जगू शकतील त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी देखील मदतीची घोषणा कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी केली होती.

मात्र फळबाग उन्हाने वाळत होत्या, शेतकरी मनातल्या मनात मदतीसाठी हंबरडा फोडत होता, पण सरकारला जाग आलेली दिसत नाही. शेतकऱ्यांनी सरकारच्या या धोरणावर जोरदार टीका केली आहे.