उद्धव ठाकरे यांच्या वरळीतील भाषणातील ठळक मुद्दे

 महापालिकाची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. वातावरण तापलं आहे. यात उद्धव ठाकरे यांची वरळी येथे सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 10, 2017, 09:29 PM IST
उद्धव ठाकरे यांच्या वरळीतील भाषणातील ठळक मुद्दे  title=

मुंबई :  महापालिकाची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. वातावरण तापलं आहे. यात उद्धव ठाकरे यांची वरळी येथे सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा... 

 

 

उमेदवारी मिळाली नाही की नाराजी ही समजू शकतो. मी सर्व शाखाचा प्रमुख हात जोडून विनंती तुम्ही कष्ट करतात. उमेदवारी हा अंतिम माझा निर्णय आहे. काही नाराजी सोडत काम करतात. 

राज्याची कामे सोडून राज्यभर बोंबलत... म्हणजे बोलत फिरताहेत.... 
आता ते गिरगाव येथे बोंबलतात.बोलतात. मुंबईला पटणा संबोधतात म्हणजे तुम्ही मुंबईकरांचा अपमान करतात. -सीएमवर टीका

पोलिस कर्मचारी राबतात कष्ट घेतात. काही दिवसांपूर्वी येथील पोलिस कर्मचारी पत्नी महिला उपोषण, समस्या याकडे लक्ष द्या असे सीएम यांना म्हटले होते. त्यावेळेस ते म्हणाले पण कुठेच काही नाही...करायला नना....ठरवतात पटणा....- सीएमवर टीका उद्धव ठाकरे यांची...

आम्ही केलेले दावे, कामे खोडून दाखवा. या आधी महापालिका कामात काँग्रेस काळात सीएम लक्ष नसे, ते कामाचे क्रेडिट घ्यायला यायचे नाही. हे मात्र आता तसे नाही. मेहनत कोण घेते पण क्रेडिट वेगळेच - उद्धव ठाकरे

पुन्हा मुंबईत पाणी तुंबणार नाही हे सेनेचे वचन आहे . बाकी राज्यांत शहरात पाणी तुंबले पण मुंबईत नाही. दुसरीकडे पाणी तुडवडा असला तरी पाणी मुंबईकरांना दिले. - ठाकरे 

सगळ्या विकास काम न पहाता मुंबईला बदनाम सीएम करतात. लाज वाटायला हवे त्यांना. - ठाकरे

मुंबईत फिरतात त्यावेळेस छत्रपती आशिर्वाद, उल्हासनगरात पप्पू कलानी. जैसे देश वैसा भेस  असं त्यांच चालय - उद्धव ठाकरे 

२५ वर्ष आम्ही नागोबाला संभाळला. आता डसतात, मला काळबेरे असणारे नकोच म्हणून युती नको ही भूमिका - उद्धव ठाकरे

बाळासाहेबांचे स्मारक हे राज्य सरकारचे काम त्यामुळं महापालिका वचनामात उल्लेख नाही - उद्धव ठाकरे 

तुम्ही होर्डींगवर मेट्रो दिसते ती काँग्रेसने केली. जी कामे तुम्ही केली नाही तुम्ही रेनकोट घाततात त्या मनमोहनसिंग यांनी  केली. दुसर्यांनी केलेले काम तुम्ही स्वतः केले असे सांगतात - ठाकरेंची भाजपावर टीका

नोटाबंदीमुळ त्रस्त केले तुम्ही आणि रांगेतील त्रस्तांना दिले पाणी - उद्धव ठाकरे

मुंबईची सेना करायची सैनिकांनी...आणि आम्ही नैवेद्य म्हणून तुम्हाला जागा वाढवायच्या -ठाकरे 

सीएम भल्ला माणूस होता, पण आता ते ही खोटनाट बोलतात. - 

परिवर्तन होणारं आहे पण कडेलोट ही होणारं -ठाकरे 

आमच्या दैवत्य महाराज यांचे फोटो गैरवापर करतात. तुम्हाला मोदी, शहा, कलानी फोटो लावा - उद्धव ठाकरे

मोदी येणार की नाही माहित नाही. पीएम, सीएम ही पदे जनतेची त्यांनी जनतेची कामे करावेत, प्रचार करू नये ही भूमिका. - उद्धव ठाकरे 

ही महापालिका निकाल पुढच्या राजकीय दिशा बदलेल