‘क्रिकेटरत्ना’ला भारतरत्न देण्यावर आक्षेप; याचिका दाखल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 19, 2013, 08:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
‘क्रिकेटरत्न’ सचिन तेंडुलकर याला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या निर्णयावर नवा वाद सुरू झालाय. आता, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालीय.
माजी क्रिकेटपटू अॅडव्होकेट शिवाजी सांगळे यांनी ही याचिका दाखल केलीय. सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार कशासाठी? सचिन स्वतःसाठी क्रिकेट खेळला... देशासाठी त्याचा फारसा उपयोग झाला नाही, असं या याचिकेत म्हटलंय.
२०० वी मॅच खेळून क्रिकेटला गुड बाय म्हणणाऱ्या सचिनला १६ नोव्हेंबर रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. राष्ट्रपती कार्यालयाकडून सचिनच्या ‘भारतरत्न’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ‘जेडीयू’चे खासदार शिवानंद तिवारी यांनी ‘करोडो रुपये कमावणाऱ्या खेळाडुला भारतरत्न देण्याची काही एक गरज नाही’ असं म्हटलं होतं. तसंच हॉकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंदच्या नावाचा या पुरस्कारासाठी का विचार करण्यात आला नाही? असंही त्यांनी विचारलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x