भारत विजयापासून चार पावले दूर

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी सामन्यात यजमान संघ विजयापासून केवळ चार पावले दूर आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवल्यास पाच सामन्यांच्या मालिकेत ते विजयी आघाडी घेतील.

Updated: Dec 12, 2016, 07:49 AM IST
भारत विजयापासून चार पावले दूर title=

मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी सामन्यात यजमान संघ विजयापासून केवळ चार पावले दूर आहे. भारताने या सामन्यात विजय मिळवल्यास पाच सामन्यांच्या मालिकेत ते विजयी आघाडी घेतील.

आजचा दिवस खेळाचा पाचवा दिवस आहे. इंग्लंड संघ अद्यापही 49 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 4 गडी शिल्लक आहेत. जॉनी बेअरस्ट्रॉ 50 धावांवर खेळत आहे. 

इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या 400 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना विराट कोहलीचे द्विशतक, जयंत आणि मुरली यांच्या शतकी खेळीने भारताने 631 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या अखेरपर्यंत इंग्लंडने सहा गडी बाद 182 धावा केल्या.