विराट काल हसला, आज फॅन्सवर चिडला

जगात दोन प्रेम करणाऱ्याला लोकांनी त्रास दिला नाही असं कधीच झालं नाही.

Updated: Mar 28, 2016, 03:30 PM IST
विराट काल हसला, आज फॅन्सवर चिडला title=

मुंबई : जगात दोन प्रेम करणाऱ्याला लोकांनी त्रास दिला नाही असं कधीच झालं नाही. कदाचित विराट कोहलीच्या फॅन्सना विराट आणि अनुष्काचा विरह टीम इंडियाच्या विजयासाठी हवाहवासा वाटत असेल. म्हणून हे सूत अजून वर्ल्डकप संपेपर्यंत जुळून येऊ नये, अशी फॅन्सची इच्छाही असेल.

भंपक विनोदांमुळे विराट संतापला

पण विराट अनुष्कावर सोशल नेटवर्किंगवर होणाऱ्या भंपक विनोदांमुळे चांगलाच संतापलाय, कदाचित त्याला अनुष्काच्या डोळ्यात अश्रू दिसत असावेत, म्हणूनच की काय, राजेश खन्नाच्या अमर प्रेम चित्रपटातील डॉयलॉग प्रमाणे, विराटही ही मनातल्या मनात म्हणत असेल, "मैने कितनी बार तुम्हे कहाँ है पुष्पा, ये आसू मेरे से देखे नही जाते, हाय हेट टिअर्स...!

विराटने अनुष्कावर विनोद करणाऱ्यांना झापले

विराटने म्हटलं आहे, अनुष्काचा माझ्या खेळावर कधीच वाईट परिणाम झाला नाही, उलट तिने खेळण्याबाबत मला नेहमीच प्रोत्साहित केलं, त्या बद्दल तिने मला नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन दिला. अशा लोकांना लाज वाटली पाहिजे जे माझी प्रत्येक नकारात्मक गोष्टीचा संदर्भ अनुष्काशी जोडतात. आणि अशा लोकांबद्दल ही लाजीरवाणी बाब आहे जे स्वत:ला सुशिक्षित समजतात. मी क्रिकेटमधील प्रदर्शन कसं होईल, यावर अनुष्काचा कोणताही संबंध नसताना, तिच्यावर आरोप करणाऱ्यांविषयी मला कीव येते. मला अशा विनोदी पोस्टबद्दल अभिमान नाही, तर मला तिच्याबद्दल दया आणि अभिमान आहे. या जागेवर तुमची बहिण, गर्लफ्रेन्ड, पत्नी असती तर तुम्हाला काय वाटलं असतं?, असं विराटने म्हटलं आहे.

पुन्हा जुळून आलं की काय?

एकंदरीत विराटच्या या पोस्टनंतर विराट आणि अनुष्काचे मैत्रीपूर्ण संबंध आणखी जुळून आले आहेत. विराट कोहलीने टीम इंडियाला काल जिंकवलं, विराट कोहलीचं सर्वांकडून भरभरून कौतुक होत आहे. मात्र सोशल मीडियावर अनुष्कावर होत असलेले विनोद विराटला जिव्हारी लागले आहेत.
यावर असं म्हणता येईल, "क्यों दुनिया उसको बददुवाँ दे रही है.... पर अभी उसके लिए दिलमें आग चल रही है"

पाहा नेमकं काय म्हणतोय विराट