विराटने हे गाणं अनुष्कासाठी तर म्हटलं नसेल ना?

विराट कोहलीने स्टेजवर जाऊन एक गाणं म्हटलं.

Updated: Mar 3, 2016, 09:05 AM IST

मुंबई : विराट कोहलीने स्टेजवर जाऊन एक गाणं म्हटलं आहे. बॉलीवूडमधील हे लोकप्रिय गाणं आहे. विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपची सध्या चर्चा आहे. हे गाणंही सध्याच्या स्थितीला साजेसं आहे. विराटने या गाण्यातून भावनिक साद तर अनुष्काला घातली नसेल ना?.

कारण हे गाणं फारचं भावनिक आहे, आणि विराटने ते गायल्यानंतर अनुष्काला त्याचा आणखी विचार करावा लागणार आहे. हे गाणं यू-ट्यूबवर व्हायरल होतंय. 'जो वादा किया है वो निभाना पडेगा'. 

हे गाणं विराटने स्टेजवर जाऊन गायलंय. विराटने जर हे गाणं निवडलं असेल, तर विराटच्या भावना निश्चितच अनुष्काला समजून घ्याव्या लागतील. नुकत्याच झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात विराटने हे गाणं म्हटलं आहे.