वर्ल्डकप आम्हीच जिंकणार : रवी शास्त्री

टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरु आहेत. सलग पाचवा विजय मिळविल्याने आत्मविश्वास वाढलेल्या टीमचे व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी वर्ल्डकप आम्हीच जिंकणार, असा दावा केलाय.

Updated: Mar 10, 2015, 06:14 PM IST
वर्ल्डकप आम्हीच जिंकणार : रवी शास्त्री title=
छाया - डीएनए

हॅमिल्टन : टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरु आहेत. सलग पाचवा विजय मिळविल्याने आत्मविश्वास वाढलेल्या टीमचे व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी वर्ल्डकप आम्हीच जिंकणार, असा दावा केलाय.

भारताने आज सलग पाजवा विजय साकारताना आयर्लंडला आठ विकेटने पराभूत केले. वर्ल्डकपमध्ये हा भारताचा लागोपाठ नववा विजय आहे. तर या स्पर्धेतील सलग पाचवा विजय आहे. त्यामुळे बी गटात भारत अव्वल क्रमांकावर आहे. तर ए गटात न्यूझीलंड अव्वल आहे.

सलग पाचवा विजय ही चांगली बाब आहे. या पुढील सर्व मॅच नॉक आऊट असणार आहे. तुम्ही जिंकत असतात तेव्हा त्या जिंकण्याची मजा वाटते आणि तुम्हांला सर्व काही सहज वाटते. तर तुम्हा जेव्हा पराभूत होतात तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये स्वतःला बंद करून घेतात, असे रवी शास्त्री म्हणालेत. दरम्यान, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी शास्त्री यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे. भारताची कामगिरीची सुधारणा झालेय. याचे श्रेय गोलंदाजांना जाते, असे ते म्हणालेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.