... आणि टीम इंडियाने अॅडलेड केले काबीज

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमधील अॅडलेड येथील तिसऱ्या वन डे मध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. अटीतटीचा झालेल्या या सामनात विजयाचा शिल्पकार ठरला तो महेंद्रसिंह धोनी.

Updated: Feb 12, 2012, 05:18 PM IST

www.24taas.com, अॅडलेड

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमधील अॅडलेड येथील तिसऱ्या वन डे मध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. अटीतटीचा झालेल्या या सामनात विजयाचा शिल्पकार ठरला तो महेंद्रसिंह धोनी. महेंद्रसिंह धोनीने विजय अक्षरश: खेचून आणला. या भारताने २ बॉल आणि ४ विकेट शिल्लक ठेऊन विजय मिळवला होता. त्यात धोनीने शेवटच्या षटकात हाणलेल्या सिक्सने भारताचा विजय निश्चित केला.

 

मॅचचे  LIVE  अपडेट पाहाण्यासाठी क्लिक करा.

 

मॅचचा नूर पाहून धोनीने अगदी बचावात्मक खेळ केला होता. पण शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला जिंकण्यासाठी १३ रनची आवश्यकता असताना धोनीने त्याचा नैसर्गिक खेळ करून भारताला विजय मिळवून दिला. त्याने ५८ बॉलमध्ये ४४ रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यात त्याने फक्त एकच सिक्स मारला. आणि तो सुद्धा शेवटच्या निर्णायक क्षणी. त्यामुळे भारताने तिसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवून या ट्राय सीरीजमधलं त्याचं आव्हान टिकून ठेवलं आहे. पण या मॅचमध्ये गौतम गंभीरने केलेले ९२ रन हे देखील या मॅचचं वैशिष्ट्य ठरलं आहे.

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये पारडं दोन्ही बाजूला सारखं झुकतं आहे. भारताला धोनी आणि सुरैश रैनाने बऱ्यापैकी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताला ५ वा धक्का बसला आहे. तो म्हणजे सुरैश रैनाच्या रुपाने रैना ३८ रनवर आऊट झाला. त्याने ३० बॉलमध्ये ३ फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. तर त्यापाठोपाठ रविंद्र जडेजा हा सुद्धा लगेचच पव्हेलियनमध्ये परतला आहे. फक्त १० रन करून जडेजा आऊट झाला. भारताला जिंकण्यासाठी ८ बॉलमध्ये १३ रन हवे आहेत. धोनी आणि अश्विन खेळत आहे.

 

अॅडलेड येथे सुरू असणारी तिसरी वनडे चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. भारताला जिंकण्यासाठी ३० बॉलमध्ये ४० रनची आवश्यकता आहे. धोनी आणि रैना चांगली बॅटींग करीत आहे. त्यामुळे भारताचा जिंकण्याचा आशा अजूनही टिकून आहेत. पण ऑसी बॉलर देखील संपूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांनी या दोन्ही बॅट्समनना बऱ्यापैकी जखडून ठेवले आहे. त्यामुळे आता भारतीय बॅट्समन विजयश्री खेचून आणणार का याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

अॅडलेड वन डे मध्ये भारताला गौतम गंभीरच्या रूपाने चौथा धक्का बसला. या सीरीजमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू न शकलेला गौतम गंभीरने मात्र चांगली फटकेबाजी करत होता. गौतम गंभीर अगदी आत्मविश्वासाने बॅटीग करत होता. त्याने अर्धशतक केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला. त्याने काही चांगल्या फटक्यांचे नमुने पेश केले.

 

गंभीर शतकाजवळ पोहचला आहे असं वाटत असताना क्लीटं मकायने त्याला पायचीत पकडलं. मात्र गंभीरबाबत दिलेला हा निर्णय थोडा साशंक असा वाटत होता. गौतमने १११ बॉलचा सामना करत ९२ रनपर्यंत मजल मारली होती त्यामध्ये त्याने ७ फोर मारले होते. गंभीर आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोर १७८ आणि ४ विकेट असा होता.

 

गंभीर नंतर कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांच्यावर मॅच जिंकून देण्याची जबाबदारी आहे. धोनी ५ रनवर आणि रैना १० रनवर खेळत आहे. भारताला १२ ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी आणखी ८२ रनची आवश्यकता आहे.

 

रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आला आहे असं वाटतं असताना एक अवाजवी फटका मारून त्याने विकेट फेकली. पण तो पर्यंत त्यांनी भारताचा स्कोर बोर्ड चांगलाच हलता ठेवला होता. रोहित शर्माने ३३ रन केले.

 

वीरेंद्र सेहवाग आऊट झाल्यानंतर भारताचा डाव सावरला तो गौतम गंभीरने. त्याला थोड्या फार प्रमाणात कोहली आणि रोहित शर्माची साथ मिळाली. मॅन इन फॉर्म असं ह्या सीरीजमध्ये म्हटलं गेलेल्या विराट कोहली मात्र चमकदार कामगिरी करू शकला नाही. तो फक्त १८ रनच करू शकला. त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने चांगले फटके मारत गंभीरला चांगली साथसोबत केली. त्यातच गौतम गंभीरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

 

भारताने तिसऱ्या वनडे मध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २७० धावांचा पाठलाग करायला सुरवात केली नेह