India-China Clash : शहिदांना भारतीय सैन्याकडून मानवंदना

Jun 17, 2020, 18:13 PM IST
1/5

भारत- चीनमध्ये लडाख येथील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री उशिरा हिंसक झडप झाली. ज्यामध्ये चीन आणि भारतीय जवान शहिद झाल्याची माहिती समोर आली. 

2/5

चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सीमावादावरुन विकोपाला गेलेल्या या वादाला वेगळं वळण मिळालं. कारण, या हिंसेचं स्वरुपच तसं होतं

3/5

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसेत भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. 

4/5

 बुधवारी या जवानांचे शव घटनास्थळावरुन हॅलिक़ॉप्टरच्या माध्यमातून लेह येथील रुग्णालयात आणण्यात आले. 

5/5

येथे जवानांच्या पार्थिवाला लष्करी इतमामात सलामी देण्यात आली. सोबतच पुष्पचक्र अर्पण करत त्यांना सैन्याकडून मानवंदनाही देण्यात आली. यावेळी वातावरणात एक वेगळीच शांतता असल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण देशानं या शहिदांना मावनवंदना वाहत त्यांच्याप्रती आदराती भावना व्यक्त केली.