Republic Day 2023: 116 वर्षात सहा वेळा बदलला झेंडा,स्वातंत्र्याआधी असा होता भारताचा राष्ट्रध्वज

Republic Day 2023: देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहे. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.पण तुम्हाला माहितेय का? गेल्या 116 वर्षात देशात सहा वेळा ध्वज बदलण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या वर्धापनादिनानिम्मित आपल्या राष्ट्रध्वजाच्या या प्रवासातील  महत्त्वाचे टप्पे  कोणते होते आणि  कधी आणि कोणते बदल घडले हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शेवटचा बदल 19747 मध्ये झाला आहे. जाणून घेऊया युनियन जॅक ते तिरंगा हा प्रवास....

Jan 22, 2023, 15:36 PM IST
1/6

पहिला राष्ट्रध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्ता येथील पारसी बागान चौक (ग्रीन पार्क) येथे फडकवण्यात आला. ज्याला आता कोलकाता म्हणतात. हा ध्वज लाल, पिवळा आणि हिरवा अशा आडव्या पट्ट्यांपासून बनवला होता. ते शीर्षस्थानी हिरवे, मध्यभागी पिवळे आणि तळाशी लाल होते. यासोबतच कमळाची फुले आणि चंद्र-सूर्यही त्यात तयार करण्यात आले होते.

2/6

एका वर्षानंतर ध्वज बदलला

पहिला ध्वज मिळून देशाला अवघे एक वर्ष होताच दुसरा ध्वज मिळाला. दुसरा राष्ट्रध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत 1907 मध्ये निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता. मात्र, ही घटना 1905 मध्ये घडल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तो देखील पहिल्या ध्वज सारखाच होता. या राष्ट्रध्वजात चंद्र तारे इत्यादीचा समावेश होता. तसेच त्यात भगवा, हिरवा आणि पिवळा या तीन रंगांचा समावेश होता. नंतर बर्लिनमध्ये एका परिषदेदरम्यान ध्वज फडकवण्यात आला.  

3/6

तिसरा ध्वज 1917 मध्ये तेव्हा राजकीय संघर्षाला निश्चित वळण मिळाले. डॉ. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळीदरम्यान फडकवले.या ध्वजावर एकामागून एक 5 लाल आणि 4 हिरव्या आडव्या पट्ट्या होत्या आणि त्यावर सप्तर्षींच्या दिशेत 7 तारे बनवले होते. त्याच वेळी, डाव्या आणि वरच्या काठावर (स्तंभाच्या दिशेने) युनियन जॅक होता. एका कोपऱ्यात पांढरी चंद्रकोर आणि ताराही होता.  

4/6

1921 मध्ये चौथ्यांदा बदलला राष्ट्रध्वज

चौथा ध्वज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनादरम्यान आंध्र प्रदेशातील एका तरुणाने ध्वज बनवून गांधीजींना दिला. हा कार्यक्रम बेजवाडा (आता विजयवाडा) येथे 1921 मध्ये झाला होता. ते दोन रंगांनी बनवले होते. लाल आणि हिरवा रंग जो हिंदू आणि मुस्लिम या दोन प्रमुख समुदायांचे प्रतिनिधित्व करतो. गांधीजींनी सुचवले की भारताच्या उर्वरित समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक पांढरी पट्टी असावी आणि देशाची प्रगती दर्शवण्यासाठी चरखा असावा.

5/6

एका दशकानंतर 1931 मध्ये राष्ट्रध्वज पुन्हा बदलला

1921 मध्ये बनवलेला भारताचा चौथा राष्ट्रीय ध्वज 10 वर्षे अस्तित्वात होता. 1931 मध्ये भारताला पुन्हा एकदा नवा राष्ट्रध्वज मिळाला. चौथ्या राष्ट्रध्वजाप्रमाणेच पाचव्या राष्ट्रध्वजामध्येही चरखाला महत्त्वाचे स्थान होते. मात्र, यावेळी रंगात बदल करण्यात आला. चरखाबरोबरच भगवा, पांढरा आणि हिरवा यांचा संगम होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने (INC) हा ध्वज औपचारिकपणे स्वीकारला.

6/6

अखेर 1947 मध्ये देशाला तिरंगा मिळाला

1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाला तिरंगा ध्वज मिळाला. घटना समितीची स्थापना झाल्यानंतर समितीने 22 जुलै 1947 ला या ठरावाला मंजुरी दिली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर हा ध्वज आपल्या भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकविण्यात आला. हा राष्ट्रीय ध्वज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते फडकविण्यात आला. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, आणि पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा आणि समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता आणि कालचक्राचे त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असा बोध या अशोकचक्रातून होतो.