एकेकाळी फक्त लूकमुळे हातातून गेले चित्रपट, आज अभिनेत्याची फी 100 कोटी रुपये

साउथ इंडस्ट्रीमधील अभिनेत्याला पहिल्या चित्रपटाच्या यशानंतरही नकाराचा सामना करावा लागला आणि लोकांनी त्याला फक्त त्याच्या लूकमुळे चित्रपटांमध्ये काम दिले नाही. पण आज तो अभिनेता साउथचा सुपरस्टार आहे. 

| Aug 17, 2024, 16:18 PM IST
1/7

अल्लू अर्जुन

बॉलिवूड असो की साउथ इंडस्ट्री, कलाकारांना त्यांच्या लूकमुळे अनेकदा चित्रपटांमध्ये नकाराचा सामना करावा लागला आहे. खरं तर, आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तो दुसरा कोणी नसून अल्लू अर्जुन आहे. 

2/7

'गंगोत्री' चित्रपटाद्वारे पदार्पण

अल्लू अर्जुनचे देशभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. अभिनेत्याने अभिनयासाठी नोकरी सोडली आणि 2003 मध्ये राघवेंद्र राव दिग्दर्शित 'गंगोत्री' चित्रपटाद्वारे पदार्पण केले. 

3/7

ऑफर आल्या नाहीत

'गंगोत्री' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. पण त्याच्या लूकमुळे अभिनेत्याला पुढे काम मिळत नव्हते. अभिनेता म्हणाला की, गंगोत्री हा चित्रपट हिट होता पण मी दिसायला चांगला नसल्याने मला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर आल्या नाहीत. 

4/7

विशेष प्रभाव

चित्रपट हा एक प्रवास असला तरी कलाकार म्हणून मी अयशस्वी झालो आहे असे मला वाटले कारण मी कोणावरही विशेष प्रभाव पाडू शकलो नाही. असे वाटले की मी शून्यातून खालच्या पातळीवर गेलो. 

5/7

'आर्या' चित्रपटात महत्त्वाची भूमिका

मात्र, त्यानंतर सुकुमार दिग्दर्शित आर्या या चित्रपटात काम केले. ज्याने त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर अल्लू अर्जुनच्या करिअरच्या आलेखात मोठी वाढ झाली. 

6/7

हिट चित्रपट

बानी द हिरो, देसमुदुरु, पारूगु, आर्य 2, वेदम, रेस गुर्रम, सररेनोडू आणि आला वैकुंठापुरमुलू यांसारखे अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले. सुकुमार या चित्रपटाने त्याचे आयुष्य बदलून टाकल्याचेही त्याने एका मुलाखतीत कबूल केले होते. 

7/7

आगामी चित्रपट

'पुष्पा द राइज'सह अभिनेता अल्लू अर्जुन संपूर्ण भारताचा स्टार बनला. आता तो एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपये आकारतो आणि हैदराबादमधील एका आलिशान बंगल्यात राहतो. ज्याची किंमत 100 कोटी रुपये आहे.  आता तो आगामी 'पुष्पा 2' चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे.