PHOTO: जैन मुनींच्या अंत्यसंस्काराला का लावली जाते बोली? त्या पैशांचं नंतर काय केलं जातं?
Jain Saint Interesting Facts: जैन समाज आपल्या त्यागासाठी ओळखला जातो. इंद्रियांवर विजय प्राप्त करण्याचे साक्षात उदाहरण आहेत जैन मुनी. उन्ह असो वा पाऊस कशाचीही तमा न बाळगता आधुनिक समाजात हे मुनी अतिशय कठोर जीवन जगत असतात. मोह, माया यापासून दूर राहण्याचा संदेश जैन मुनी आपल्या जगण्यातून देत असतात.
जैन समाजाच्या नियमानुसार जैन मुनींचे अंत्य संस्कार केले जातात. अंत्य संस्काराच्या अगोदर महाराजांना डोलीमध्ये बसवून त्यांची अंत्ययात्रा काढली जाते. जैन समाजाच्या नियमांबाबत इतर धर्मातील लोकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. जैन मुनींच्या अंत्यसंस्काराला बोली लावली जाते. तसेच ते पैसे विशिष्ट गोष्टीसाठी वापरले जातात.
अंत्ययात्रेला बोली लावण्यामागचे कारण
![अंत्ययात्रेला बोली लावण्यामागचे कारण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/24/770428-jain.png)
दोन प्रकारचे मुनी
![दोन प्रकारचे मुनी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/24/770427-jainmuni4.png)
जैन धर्मात साधुंच्या 11 भूमिकांमध्ये उल्लेख केला आहे. 11 भूमिकांमध्ये सर्वात पहिली भूमिका क्षुल्लक मानली आहे. क्षुल्लक म्हणजे लहान. यामध्येही क्षुल्लक आणि ऐकल असे असते. क्षुल्लका आणि ऐलक साधू दोघेही अन्नाची याचना करतात. क्षुल्लक साधू त्यांच्याबरोबर एक कोपिन आणि एक चादर घेऊन जातात, तर ऐलक फक्त कोपिन घेऊन जातात आणि त्यांच्या तळहाताच्या बोटांनी अन्न खातात. ऐलक केशलोंच करतात.
सल्लेखना, समाधि या संथारा
![सल्लेखना, समाधि या संथारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/24/770425-jainmuni5.png)
जैन मुनी सल्लेखनाच्य माध्यमातून आपला देह सोडतात. याला समाधी घेणे किंवा संथारा असे देखील म्हणतात. मृत्यू जवळ आल्याचे समजून स्वीकारली जाणारी प्रथा आहे. यामध्ये जेव्हा जैन साधु किंवा साधवी यांना जाणवते की, ते मृत्यूच्या जवळ आले आहेत तेव्हा ते अन्न-पाण्याचा त्याग करतात. दिगंबर जैन समाजात याला समाधी घेणे किंवा सल्लेखना असे म्हटले जाते. आणि श्वेतांबरमध्ये संथारा म्हटलं जातं.
पालखीमध्ये बसवून अंत्ययात्रा
![पालखीमध्ये बसवून अंत्ययात्रा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/24/770424-palakhi.png)
संथाराच्या माध्यमातून देह त्याग करणाऱ्या जैन मुनींचे अंत्य संस्कार के झोपून केले जात नाही. तर बसून करण्याची पद्धत आहे. देह त्याग करणाऱ्या मुनींचे पार्थिव शरीर एका पालखीमध्ये बसवले जाते आणि अंत्ययात्रा काढली जाते. पार्थिव शरीराला लाकडाच्या खुर्चीत बसवून बांधले जाते. पाहिल्यावर असं जाणवतं की, मुनी ध्यान मुद्रेत बसून ईश्वराचे स्मरण करत आहेत.
जैन मुनी कसे होऊ शकता.
![जैन मुनी कसे होऊ शकता.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/24/770422-jainsaraswatisadhana.png)
अंत्ययात्रेत बोली
![अंत्ययात्रेत बोली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/24/770421-jainmunideath1.png)