Pitru Paksha 2023 : पितृपक्ष पंधरवडा सुरु झाला आहे. या काळात पितरांच्या शांती आणि तृप्तीसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जाते. महाराष्ट्रात तिथीनुसार पितरांचं श्राद्ध केलं जातं. पितरांच्या आशीवार्दामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात गाय नाही, श्वान नाही तर कावळ्याला अतिशय महत्त्व असतं. महाराष्ट्रात श्राद्धाची वाडी कावळ्याला दिली जाते. इतर वेळी अंगणात काव काव करणाऱ्या कावळ्याला आपण हकलून लावतो. (pitru paksha importance of crow Relationship between crow, wad and pimpal tree video)
ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, 'पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' याचा अर्थात कावळ्याची काव काव शकुन आहे. याच कावळ्याला पितृपक्षात अतिशय मान असतो. मग यामागील शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का? कावळा, वड आणि पिंपळ यांच्या एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. चला ज्योतिषशास्त्र तज्ञ्ज आनंद पिंपळकर यांनी कावळ्याचे महत्त्व समजून सांगितलं आहे.
वड आणि पिंपळ हे दोन वृक्ष असं आहेत जे एकाच वेळी दुपटीने ऑक्सिजन निर्माण करत असतात. जगात सर्व झाडांची रोप ही बीज प्रक्रियेद्वारे आपण लावू शकतो. पण वड आणि पिंपळ ही दोन वृक्ष अशी आहेत की, ती बीज निर्मितीने होऊ शकतं नाही.
तर या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरुपाची फळं जेव्हा कावळा खातो. ही फळं इतर पक्षी खात नाहीत, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा तो अंकुर कावळ्याच्या पोटात जातो. त्यानंतर कावळा विष्ठा करतो तिथे वड किंवा पिंपळ झाड उगवतं. याचा अर्थ कावळ्यांशिवाय ही झाडं टिकणार नाही किंवा वाढणार नाही. त्यामुळे कावळ्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे.
तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे कावळ्याचं अंडी घालण्याचं काम असतं ते भाद्रपद महिन्यात असतं. त्यामुळे त्यांना पोषक आहार मिळावा आणि सृष्टीचक्र व्यवस्थीत चालावं म्हणून पितृपक्षात कावळ्याला महत्त्व आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.