तिसरी टी-20 : भारतानं टॉस जिंकून घेतली बॉलिंग

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकला आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 24, 2017, 06:44 PM IST
तिसरी टी-20 : भारतानं टॉस जिंकून घेतली बॉलिंग  title=

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. कटक आणि इंदूरमधल्या टी-20 भारतानं दणक्यात जिंकल्या होत्या. त्यामुळे ही सीरिज भारतानं आधीच जिंकली आहे. आता श्रीलंकेला व्हाईटवॉश करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरत आहे.

इंदूरमध्ये झालेल्या मॅचनंतर आज मुंबईत होणाऱ्या मॅचमध्ये भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. इंदूरमध्ये श्रीलंकेच्या ४ विकेट काढणाऱ्या युझवेंद्र चहलला विश्रांती देण्यात आली आहे. चहलऐवजी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा, के.एल.राहुल, एम.एस.धोनी, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, दिेनेश कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जयदेव उडानकट, मोहम्मद सिराज