'शब्दांच्या पलीकडे....', घटस्फोटाच्या तणावादरम्यान हार्दिक पांड्याची मुलासाठी पोस्ट, म्हणाला 'माझं ह्रदय...'

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) दौऱ्यावर आहे. वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 30, 2024, 12:47 PM IST
'शब्दांच्या पलीकडे....', घटस्फोटाच्या तणावादरम्यान हार्दिक पांड्याची मुलासाठी पोस्ट, म्हणाला 'माझं ह्रदय...' title=

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारमांमुळे चर्चेत आहे. आधी नताशाबोत झालेला घटस्फोट आणि नंतर टी-20 कर्णधारपद हातातून निसटल्याने हार्दिक पांड्याची चर्चा आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू कामगिरी केल्यानंतरही हार्दिक पांड्याला कर्णधारपद देणं टाळण्यात आलं. तर दुसरीकडे चार वर्षाच्या संसारानंतर नताशा आणि तो विभक्त झाले. यादरम्यान हार्दिक पांड्या सध्या श्रीलंकेच्या (Sri Lanka) दौऱ्यावर आहे. त्यात आज त्याचा मुलगा अगस्त्यचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 

आज म्हणजेच 30 जुलैला हार्दिक पांड्याच्या मुलाचा वाढदिवस आहे. तो 4 वर्षांचा झाला आहे. हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटानंतर अगस्त्यचा हा पहिलाच वाढदिवस आहे. यामुळे हार्दिक पांड्या काहीसा भावूक झाल्याचं दिसत आहे. त्याने इंस्टाग्रामवर मुलासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, "तू मला प्रत्येक दिवशी पुढे जाण्यासाठी हिंमत देत आहेत. माझ्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीचा साथीदार, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझं ह्रदय, माझा अगस्त्य. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे शब्दांत सांगणं कठीण आहे".

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

हार्दिक पांड्याने 18 जुलैला आपल्या चाहत्यांना नताशापासून विभक्त होत आहे अशी माहिती दिली. तसंच घटस्फोटानंतर आम्ही दोघे मिळून मुलाचा सांभाळ करणार आहोत असंदेखील स्पष्ट केलं होतं. पण घटस्फोटानंतर एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये अगस्त्य नताशासह विमानतळावर दिसत आहे. त्यामुळे नताशा मुलाला घेऊन सर्बियाला गेली असल्याचं बोललं जात आहे. 

हार्दिकच्या आयुष्यात अनेक चढउतार

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात अनेक चढउतार सुरु आहेत. आधी त्याला आयपीएलमध्ये रोहित शर्माला हटवून मुंबई इंडियन्सचा कर्णधार कऱण्यात आलं. त्याला कर्णधार कऱणं मुंबईच्या चाहत्यांना अजिबात रुचलं नव्हतं. त्यात आयपीएलमधील संघाच्या खराब कामगिरीने त्यात भर टाकली होती. यानंतर भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याचं कौतुक होऊ लागलं. त्यातच रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केल्याने हार्दिक पांड्याला श्रीलंका दौऱ्यात कर्णधार केलं जाईल अशी शक्यता व्यक्त होऊ लागली. पण त्याला उपकर्णधारही करण्यात आलं नाही. 

दुसरीकडे त्याच्या वैवाहित आयुष्यात सर्व काही ठीक नाही अशी चर्चा रंगली होती. नताशा आणि त्याच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा  होत्याय. पण दोघांनी त्यावर अधिकृतपणे काही भाष्य केलं नव्हतं. पण नताशाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरही हार्दिकसाठी पोस्ट न केल्याने त्यावर शिक्कामोर्तबच झालं होतं. अखेर 18 जुलैला हार्दिक पांड्याने अधिकृत माहिती दिली. हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघासह श्रीलंका दौऱ्यावर आहे.