भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian Women Cricket Team) टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. दुबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 160 धावा केल्या होत्या. कर्णधार सोफीने नाबाद 57 धावा ठोकल्या. पण भारतीय संघ फक्त 102 धावांवर ऑल आऊट झाला. रोजमेरीने 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्यात एका क्षणी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरची पंचांसह जोरदार शाब्दिक चकमक झाली. अम्पायर्सनी न्यूझीलंडची फलंदाज अमेलिया कौरला नाबाद दिल्याने हा वाद झाला.
14 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर हा सगळा प्रकार घडला. न्यूझीलंडच्या केरने लाँग ऑफला चेंडू टोलावला आणि एक धाव काढली. हरमनप्रीत कौरने चेंडू अडवला होता. एकीकडे ओव्हर संपलेली असल्याने हरमनप्रीतला चेंडू डेड आहे असं वाटलं, तर दुसरीकडे केरने दुसऱ्या रनसाठी धाव घेतली. पण तो पूर्ण करण्याआधी ती रन आऊट झाली. पण तोपर्यंत अम्पायर्सनी टोपी दिप्ती शर्माकडे दिली होती आणि ओव्हर पूर्ण झाल्याचं जाहीर केलं होतं.
भारतीय संघाने रन-आऊटसाठी अपील केली होती आणि दुसरीकडे केरनेही डग-आऊटच्या दिशने चालण्यास सुरुवात केली होती. पण अम्पायर्सनी ओव्हर संपली असल्याने ही धाव अयोग्य होती असं सांगत तिला नाबाद जाहीर केलं.
Amellia Kerr was out or not out #INDvsNZ #T20WorldCup #T20WomensWorldCup #harmanpreetkaur pic.twitter.com/y9PoOA2wSa
— ANUJ THAKKUR (@anuj2488) October 4, 2024
या संपूर्ण प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि नियमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले. भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विननेही एक्स्वर या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, नंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. "दुसरी धाव घेण्याच्या आधीच ओव्हर जाहीर करण्यात आली होती. नेमकी ही चूक कोणाची?," अशी विचारणा अश्विनने केली होती.

दरम्यान पराभवानंतर हरमनप्रीतने आपल्या संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी केली नसल्याचं मान्य करत, पुढील सामन्यात सुधारणा होईल याकडे लक्ष देवू असं म्हटलं आहे.
"आम्ही आज आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळले नाही. पुढे जाऊन आम्हाला कोणत्या क्षेत्रात सुधारणा करायची आहे याचा विचार केला पाहिजे. आता प्रत्येक खेळ महत्त्वाचा आहे आणि आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही काही संधी निर्माण केल्या होत्या. ते आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले, यात शंका नाही," असं हरमनप्रीतने सामन्यानंतर सांगितलं.
"या टप्प्यावर तुम्ही चुका करू शकत नाही. आम्ही अनेक वेळा 160-170 धावांचा पाठलाग केला आहे. पण त्या खेळपट्टीवर 10 ते15 अतिरिक्त धावा होत्या. एका टप्प्यावर त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, ते पाहता 180 पर्यंत पोहोचतील असं वाटलं होतं. आम्हाला अपेक्षित असलेली ही सुरुवात नव्हती," असंही ती पुढे म्हणाली.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.