विराटच्या पार्टीत माल्ल्या आल्यावर टीम इंडियाची पळापळ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने हजेरी लावल्यानं खळबळ माजली आहे. 

Updated: Jun 6, 2017, 08:50 PM IST
विराटच्या पार्टीत माल्ल्या आल्यावर टीम इंडियाची पळापळ title=

लंडन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या चॅरिटी कार्यक्रमाला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने हजेरी लावल्यानं खळबळ माजली आहे. पण या कार्यक्रमाला विजय माल्ल्याला कोहलीनं आमंत्रण दिलं नव्हतं. कार्यक्रमाशी संबंधित कोणीतरी माल्ल्याला या कार्यक्रमाला बोलावलं असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान विराटच्या या कार्यक्रमामध्ये टीम इंडियाचे बाकी सदस्यही उपस्थित होते. पण माल्ल्याला पाहताच विराटसह इतर खेळाडूंनी कोणताही वाद होऊ नये म्हणून पळ काढला. माल्ल्याला पाहून टीम इंडियाचे सदस्य घाबरून गेले होते. तसंच ते माल्ल्याला टाळायचा प्रयत्न करत होते. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्यानं ही प्रतिक्रिया दिलेली आहे.