श्रीलंकेसोबत पराभूत झाल्यावर विराट कोहलीवर भडकला विनोद कांबळी

 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ कमकुवत श्रीलंकेशी ७ विकेटने पराभूत झाला. या पराभवानंतर विराट कोहली अनेकांच्या निशाण्यावर आला आहे. 

Updated: Jun 9, 2017, 09:11 PM IST
 श्रीलंकेसोबत पराभूत झाल्यावर विराट कोहलीवर भडकला विनोद कांबळी title=

नवी दिल्ली :  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ कमकुवत श्रीलंकेशी ७ विकेटने पराभूत झाला. या पराभवानंतर विराट कोहली अनेकांच्या निशाण्यावर आला आहे. 

माजी क्रिकेटर विनोद कांबळी याने विराट कोहलीच्या सामन्याच्या योजनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय कर्णधाराने पाकिस्तानाकडून काही शिकले पाहिजे. 

कांबळीने ट्विट करून कोहलीला विचारले की, मिस्टर कोहली, मॅच संदर्भात प्लॅनिंग कुठे होती. तुझी तयारी नाही दिसली, पाकिस्तानी संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कशी योजना बनवली. 

भारताला अपेक्षेने कमकुवत श्रीलंकेने सात विकेटने पराभूत केले.