पाकचा भ्याड हल्ला

`... तर भारत - पाक संबंध स्थिर राहणार नाहीत`

पाकिस्ताननं पूँछ भागात केलेल्या क्रूर हल्ल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय. परिस्थिती अशीच राहिली तर भारत पाक संबंध स्थिर राहणार नाहीत, असं मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलंय.

Jan 15, 2013, 05:23 PM IST

पाकच्या भ्याड हल्ल्यामागे हाफीज सईद

पाकिस्तानच्या हल्ल्लात पूँछमधल्या मेंढरमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बाबतीत एक नवा खुलासा झालाय. या हल्ल्यामागे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड हाफिज सईदचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

Jan 10, 2013, 12:59 PM IST