लातूर

प्यायल्या पाण्याला लातूरकर जागले!

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून लातूरकडे पाहिले जात होते. मात्र, या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला आहे.

Apr 21, 2017, 04:05 PM IST

शून्यातून भाजप सत्तेत, अभिनेता रितेशचा प्रचार तरीही काँग्रेस फ्लॉप

गतवर्षी येथे भाजपची एकही जागा नव्हती. त्यामुळे शून्यातून सत्तेत भाजप बसला आहे. तर दुसरीकडे स्टार प्रचारक म्हणून अभिनेता रितेश देशमुख प्रचारात उतरला होता. मात्र, याचा प्रभाव मतदारांवर पडलेला नाही.  

Apr 21, 2017, 01:34 PM IST

लातुरात देशमुख गड ढासळला, भाजपची मुसंडी

 अमित देशमुख यांना काँग्रेसचा लातूर गड कायम राखण्यात अपयश आले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा धुव्वा उडवलाय.

Apr 21, 2017, 12:34 PM IST

लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांचा आज निकाल

सोमवारी पार पडलेल्या लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणूकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. आज सकाळी 10 वाजता तिन्ही शहरात मतमोजणीला सुरूवात होईल. 

Apr 21, 2017, 07:40 AM IST

बहिण्याच्या लग्नाच्या खर्चाच्या भीतीने भावाची आत्महत्या

लातूरमध्ये हुंडा देण्यास पैसै नाही म्हणून आत्महत्या करणा-या शितल वायाळची बातमी जुनी होत नाहीच तोच बहिणीच्या लग्नाच्या खर्चाच्या चिंतेनं भावानं आत्महत्या केलीय. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या भादली गावात ही घटना घडली आहे. 

Apr 19, 2017, 07:56 PM IST

खासदार रवींद्र गायकवाड यांची दबंगगिरी

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणापासून चर्चेत असलेले उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणूकीची धामधूम एकीकडे सुरु असताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एसबीआयच्या एटीएमपुढे चांगलाच गोंधळ घातला. 

Apr 19, 2017, 08:14 AM IST

सुशीलकुमार शिंदे यांना मित्राची आठवण येत आहे

लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे ही शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरले होते.

Apr 17, 2017, 11:21 AM IST

हुंड्याच्या फासाचे आणखी किती बळी?

लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीने आर्थिक विवंचना आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यामुळे आत्महत्येचं हे लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचल्याचं पहायला मिळतंय... पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शितलच्या आत्महत्येमागे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे हुंड्याचा गळफास... हुंड्याच्या या दुष्टचक्रातून महाराष्ट्राची सुटका होणार तरी कधी? हाच प्रश्न प्रत्येकाला वेदनादायी सतावतोय. 

Apr 15, 2017, 08:10 PM IST