किरकोळ घटना

राज्यात किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत, आज निकाल

राज्यातील काही महानगर पालिका आणि ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. कडक उन्हामुळे मतदानला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, काही ठिकाणी चांगले मतदान झाले.  बदलापूर ५६, अंबरनाथ ४८, नवी मुंबई ५०, औरंगाबाद ६०, वरणगाव-जळगाव ७८ टक्के, भोकरमध्ये ७४, राजूरमध्ये ७५.८ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण एक तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील, अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Apr 22, 2015, 07:24 PM IST