खेडे

स्वातंत्र्याला झाली ७० वर्षे; अद्यापही गावात पोहोचली नाही वीज

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरून तडाखेबंद भाषणही ठोकले. पण, दुर्दैव असे की देशातील अनेक वाड्या, वस्त्या आणि पाड्यांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य केवळ कागदावरच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात सावरदेव पाडा गावामध्ये स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही वीज पोहोचली नाही. त्यामुळं इथल्या गरीब आदिवासींची ही दिवाळीसुद्धा अंधारातच गेली.

Oct 25, 2017, 04:41 PM IST