सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सुरक्षा रक्षक संपावर गेल्याने मुंबई मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

महाराष्ट्र सुरक्षा दलातील मेट्रोमधील कार्यरत असलेले जवान आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलात महिला आणि पुरुष कार्यरत असून विविध मांगण्यांसाठी सरकारशी बोलणी सुरू आहेत. पण मागील 7 वर्षापासून या सुरक्षा रक्षकांना कायम स्वरूपी नोकरीत सामावून घेतलेलं नाही. त्याचप्रमाणे पोलीस म्हणून त्यांना सेवेत दाखल केले असले तरी पोलिसांचा कोणताच दर्जा मिळत नसल्याची तक्रार यासुरक्षा रक्षकांनी केली आहे.

Sep 19, 2017, 01:06 PM IST