मुंबई विद्यापीठाच्या एम.ए सोशिऑलॉजीची संपूर्ण बॅच नापास

विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं परिसीमा गाठली आहे. एम.ए सोशिऑलॉजीची यंदाची संपूर्ण बॅचच नापास झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक किंवा दोन विषयात १०० पैकी शून्य गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे १०० जणांची ही अख्खी बॅचच नापास झाली आहे.

Updated: Sep 6, 2017, 01:37 PM IST
मुंबई विद्यापीठाच्या एम.ए सोशिऑलॉजीची संपूर्ण बॅच नापास title=

मुंबई : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं परिसीमा गाठली आहे. एम.ए सोशिऑलॉजीची यंदाची संपूर्ण बॅचच नापास झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक किंवा दोन विषयात १०० पैकी शून्य गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे १०० जणांची ही अख्खी बॅचच नापास झाली आहे.

ऑनलाईन पेपर तपासणीनं निकालांसाठी देण्यात आलेल्या आजपर्यंतच्या सर्व डेडलाईन चुकवल्या आहेत. त्यात असे निकालांचे गोंधळ यांमुळे लाखो मुलांच्या अख्ख्या वर्षाची पुरेवाट लागली आहे. पदवी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हाय कोर्टाला दिलेली ६ संप्टेंबरची डेडलाईन आज संपते आहे. पण अद्याप विविध १४ परीक्षांचे निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. शिवाय, हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालात गैरहजर दाखवण्यात आलंय. इतकच काय तर टॉपर्स विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याचीही अनेक उदाहरणे समोर येतायत. त्यामुळे मुंबई विद्यापीठ निकाल जाहीर करण्यासाठी आणखी किती दिवस लावणावर असा प्रश्न विचारला जातोय. विद्यार्थ्यांमधला संताप वाढत चाललंय. शेकडो विद्यार्थ्यींच्या पोस्ट ग्रॅज्यूएशनच्या संधी हुकल्या. अशात विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होतंय. पण राज्य सरकार आणि कुलपती काय दिलासा देणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागलं आहे.