अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये दुबईतील 'तो' VIDEO VIRAL

Abhishek Bachchan- Aishwarya Rai : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा दुबईतील तो व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल...

दिक्षा पाटील | Updated: Sep 2, 2024, 12:30 PM IST
अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये दुबईतील 'तो' VIDEO VIRAL title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan- Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांमध्ये काही स्थिर नसल्याचं म्हटलं जात होतं. तर ते दोघं विभक्त होणार असल्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून सुरु होत्या. मात्र, अभिषेकनं एका मुलाखतीत त्याच्या हातात असलेली लग्नाची अंगठी दाखवत या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं. आता त्या दोघांचा पुन्हा एकदा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे आता वेगळीच चर्चा रंगली आहे. 

ऐश्वर्या रायच्या एका फॅन पेजनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या हे दुबई विमानतळावर असल्याचे दिसत आहे. त्या तिघांचा हा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत एकटाच पुढे जात आहे तर त्याच्या मागेमागे ऐश्वर्या आणि आराध्या जाताना दिसत आहेत. ऐश्वर्यानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर आराध्यानं गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. तर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याला एकत्र पाहिल्यानंतर त्या दोघांमध्ये कोणतेही मदतभेद नसून त्यांच्यात दुरावा नाही असं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ऐश्वर्यानं त्यांच्यात रोज भांडण होतात याचा खुलासा केला होता. तर अभिषेकनं स्पष्ट करत सांगितलं की ही भांडण नाही तर आम्ही मत मांडतो तेव्हा होणारे छोटे-मोठे वाद होतात पण ती हेल्दी भांडण असतात असं त्यानं म्हटलं होतं.  

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्या नातीनं जे ठरवलं ते मिळवलंच; अखेर तिला मिळाली नशिबाची साथ...

ऐश्वर्या आणि अभिषेकविषयी बोलायचे झाले तर ते दोघं 2007 मध्ये लग्न बंधनात अडकले. खरंतर अभिषेकनं ऐश्वर्याला पॅरिसमध्ये रोमॅन्टिक स्टाईलमध्ये प्रपोज केलं होतं. तर अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये जवळीक कधी आली याविषयी बोलायचे झाले तर ते दोघं 'उमराव जान' या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जवळ आले होते. आधी चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही काळ एकत्र राहिल्यानंतर त्यानं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 2007 मध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेतल्या. तर 2011 मध्ये ऐश्वर्यानं आराध्याला जन्म दिला.